ज्यांनी गंभीर आरोप केले त्यांच्यावर काय कारवाई केली ? , नाथाभाऊ संतप्त 

ज्यांनी गंभीर आरोप केले त्यांच्यावर काय   कारवाई  केली ? , नाथाभाऊ संतप्त 

मुंबई : राजकियहेतूने प्रेरित होवून तथ्यहिन आरोप केले जातात. त्याची चौकशी होते. त्यात काहीच तथ्य निघाले नसल्याने आरोप तथ्यहिन निघाल्यावर आरोप करणारांवर काय  कारवाई होणार ? असा संतप्त सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारला विचारला. सरकारला घरचा आहेर देत खडसे यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायावरही भाष्य केले. 

खडसे म्हणाले, " माझ्यावर अनेक आरोप झाले ज्याचे तथ्य शून्य आहे. दोषी असेल तर त्याला फाशी द्या. पण बेछूट आरोप झाल्यानंतर चौकशी पुर्ण झाल्यानंतर आरोप करणारांवर काय कार्यवाही केली गेली हे सांगावे. माझ्यावर राजकीय उद्देशाने तथ्यहिन आरोप केले गेले. सगळ्या आरोपांची चौकशी झाली. त्यात काहीच निघाले नाही. माझ्यालागोपाठ चौकशीही झाल्या आहेत. एका आरोपात तथ्य निघाले नाही. ज्यांनी हे आरोप केले त्यांच्यावर काय कार्यवाही केली ? 
तथ्य आढळले नसेल ते आरोप करणाऱ्यांवर काय कार्यवाही होते ?'' 

एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर निवेदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,की हे खरे आहे की राजकीय हेतून आरोप केले जातात. मात्र, खोट्या तक्रारीला लॉजिकल एन्ड काय हे गटनेत्यांच्या बैठकीत ठरवू. सगळ्या पक्षांच्या गटनेत्यांची एक बैठक आयोजित करून त्यात निर्णय घेण्यात येईल" 

दरम्यान, पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या भोसरीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) तीन एकर जमिनीच्या मुद्द्यावरून खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्याचबरोबर खडसे यांचा कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम यांच्याशी संबध असल्याचे आरोपही करण्यात आले होते. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी पुर्ण करण्यात आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com