शिक्षणमंत्री अँड. आशिष शेलार यांचा शिक्षकांना मोठा दिलासा : संच मान्यतेला स्थगिती

..
ashish_shelar_
ashish_shelar_

मुंबई : शिक्षक संख्या जास्त ठरु नये म्हणून इयत्ता 11 वी करीता केवळ यावर्षी करीता संचमान्यता स्थगित करुन मागिल वर्षीच्या विद्यार्थी संख्येनुसार अनुज्ञेय असलेला शिक्षक संच देण्यात यावे असे निर्देश शालेय शिक्षण क्रिडा व युवक कल्याण मंत्री अँड. आशिष शेलार यांनी आज दिले. त्यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दर वर्षी शिक्षण विभागातर्फे संचमान्यता करण्यात येते त्यानुसार यावर्षी 11 वीची संचमान्यता करावी लागणार होती. यावर्षी दहावीचा निकाल पहाता संचमान्यता केल्यास शिक्षक संख्या अतिरिक्त ठरेल अशी भिती मुंबई ज्युनिअर काँलेज टीचर युनियन या शिक्षक संघटनेने व्यक्त केली होती. तसेच शिक्षक आमदारांनीही याकडे शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले होते.

दरम्यान आज शालेय शिक्षणमंत्री अँड आशिष शेलार यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन केवळ एका वर्षा करीता संचमान्यता करण्यास स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता गतवर्षीच्या विद्यार्थी संख्येचा विचार करुन अनुज्ञय असलेला शिक्षकसंच ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
या निर्णयामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com