देसाई घराणे अन्‌ कार्यकर्त्यांच्या नादाला लागू नका : शंभूराज यांचा पाटणकरांना इशारा 

 देसाई घराणे अन्‌ कार्यकर्त्यांच्या नादाला लागू नका : शंभूराज यांचा पाटणकरांना इशारा 

मोरगिरी : मला राजकारणातून संपविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र 'तिसरी पिढी' उद्धार करते असे म्हटले जाते. म्हणूनच शंभूराज ही देसाई घराण्यातील तिसरी पिढी आहे. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका, असा इशारा आमदार शंभूराज देसाई यांनी दिला. 

'शंभूराज' ने 2004 आणि 2014 या दोन पंचवार्षिक निवडणुकीत ज्यांनी देसाई घराणे राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न केला त्या माझ्या विरोधकांना माझे थेट आव्हान आहे. त्यांनी 2004 आणि 2009 मधील देसाई यांच्याच मतांधिक्‍याची बेरीज करावी, असे आव्हान त्यांनी दिले. मी लोकनेते बाळासाहेब यांचाच नातू आहे, देसाई गटाचा कार्यकर्ता एकदा इर्षेला पेटला की कसा विक्रम होतो ते संपूर्ण जिल्ह्याने अनुभवले आहे. त्यामुळे देसाई घराण्याच्या आणि देसाई गटाच्या कार्यकर्त्यांच्या नादाला लागू नका असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला. 

दौलतनगर (ता. पाटण, जि.सातारा) येथे आपल्या 52 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित जाहीर सभेत शंभूराज देसाई बोलत होते. ते म्हणाले, राज्याच्या राजकारणातील कर्तबगार आणि स्वाभिमानी मंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी आपल्या मंत्रिपदाचा लाथ मारून स्वाभिमान जपला. कै. वसंतराव नाईक यांना अडीच वर्षाच्या काळासाठी मुख्यमंत्रिपद आणि लोकनेते यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री पद असा त्याकाळी फॉर्म्युला ठरला. केवळ लोकनेत्याच्या कर्तबगार नेतृत्व आणि करारी बाण्यामुळे राज्यातील तत्कालीन इतर मातब्बर कॉंग्रेसवाल्यांची नावे पडद्याआड जातील या भितीमुळे कुटील डाव रचून लोकनेत्यांना मुख्यमंत्री पदापासून जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्याचे कारस्थान त्यावेळच्या कॉंग्रेसने केले. म्हणूनच कसलाही विचार न करता लोकनेत्यांनी आपल्या मंत्री पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. तसेच कारस्थान पुढे स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांच्या राजकीय जीवनात घडवून तत्कालीन कॉंग्रेसने देसाई घराण्यावर अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला. 

2009 ते 2014 या कालावधीत विरोधकांच्या हातात पाटणची आमदारकी होती. तर 2014 ते 2019 या कालावधी मध्ये माझ्या हातात आमदारकी जनतेने सोपवली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य जनतेने आपल्या गावांत झालेल्या विरोधकांच्या आणि माझ्या पाच वर्षातील विकासकामांची तुलना करावी आणि यामध्ये विरोधकांपेक्षा एक रुपयाचे जरी काम जादा झाले असेल तर विकास काम पाहून जनतेने मतदान करावे आणि 2019 चा आमदार निवडावा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

आपण 2014 च्या वचननाम्याची पूर्तता करूनच 2019 च्या निवडणूकीसाठी समोरे जाणार असून त्याचबरोबर 2014 च्या निवडणुकीमध्ये दौलतनगर येथील सभेत ज्याप्रमाणे देसाई गटाचाच गुलाल उधळण्याचा निर्धार करण्यात आला होता त्याप्रमाणे यावेळी वर्षभर अगोदरच 2019 चा गुलाल या ठिकाणीच उधळण्याचा निर्धार करण्यात आला.

यावेळी श्रीमती विजयादेवी देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, सौ स्मितादेवी देसाई, सौ अस्मितादेवी देसाई, यशराज देसाई, जयराज देसाई, आदित्यराज देसाई, तसेच कराड दक्षिणचे  उदयसिंह पाटील उपस्थित होते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com