नगरच्या विकासाची जबाबदारी घेतो : धनंजय मुंडे 

चार वर्षे झाली, कुठे गेला काळा पैसा?
नगरच्या विकासाची जबाबदारी घेतो : धनंजय मुंडे 

नगर : भाजपने नगरसाठी तीन कोटी देण्याचे आश्वासन दिले, पण तीन कोटी देण्याची लायकी तरी आहे का? भाजप आणि शिवसेनेचे सरकार हे लबाडांचं सरकार आहे, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवर तोफ डागली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची सांगता मुंडे यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी झाली. 

यावेळी मुंडे म्हणाले, या सरकारने गरीब जनतेच्या डोळ्यात धुळ फेकली. दोन्हीही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काळा धन आणणार होते, चार वर्षे झाली, कुठे गेला काळा पैसा? जनतेच्या खात्यात १५ लाख देणार होते, आले का. जनतेने विश्वास ठेवू नये. विश्वासघात करून त्यांनी खिशाला चुना लावला. या सरकारने गॅस, रॉकेल, दाळ, पेट्रोल, डिझेलचे दर वाढवून गोरगरीबांच्या खिशावर डल्ला मारला. नगरला तर सत्ता असूनही त्यांना विकास करता आला नाही. आगामी काळात त्यांना निवडून दिले, तर लोकशाही धोक्यात येईल, असा आरोप मुंडे यांनी केला.

राज्यातील नेते शरद पवार, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या या सर्व उमेदवारांना निवडून दिले, तर शहराचा विकास होईल. शहर बदलण्याची जबाबदारी आम्ही घेतो, असे मुंडे म्हणाले. या वेळी आमदार संग्राम जगताप तसेच मान्यवरांची भाषणे झाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com