मराठवाड्यातील हक्काचं पाणी परत मिळवले - फडणवीस

 मराठवाड्यातील हक्काचं पाणी परत मिळवले - फडणवीस

नांदेड : प्रगतीचं पहिलं काम रस्ते विकास व रेल्वेमार्ग असतो. 25 वर्षापासून रखडलेली ही कामे सरकारने प्राधान्याने हातात घेतली आहेत. मराठवाड्यातील पळवलेले हक्काचं पाणी संघर्ष करून परत मिळवलं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी लोहा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 च्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी गुरूवारी केले. 

लोहा येथे गुरूवारी सकाळी बारा वाजता नेट इलेक्‍ट्रॉनिक कळ दाबून भूमिपूजन झाल्याचे त्यांनी जाहीर केले. प्रारंभी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते खारीक खोबऱ्याच्या हाराने मान्यवरांचा सत्कार पारंपारिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, कामगारमंत्री संभाजी निलंगेकर, आमदार तुषार राठोड, विनायक पाटील, सुधाकर भालेराव, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, माजी आमदार किशनराव राठोड, गणेश हाके, गोविंदराव केंद्रे आदींची उपस्थिती होती. 

मुख्यमंत्री म्हणाले की, दमनगंगा प्रकल्पात मराठवाड्याचे हक्काचे 14 टीएमसी पाण्यापासून वंचित रहावे लागले. त्यातील सात टीएमसी पाणी संघर्ष करून परत मिळवले आहे. या भागातील यापुढे 50 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्याची तूट भरून काढणार आहे. विकासाच्या मुद्द्यावरच भाजप सरकार काम करत असून यापुढे देखील विकासावर भर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com