राज्यात बदलाचे वारे : नवाब मलिक 

राज्यात बदलाचे वारे : नवाब मलिक 

मुंबई : देशासह राज्यातील राजकीय परिस्थिती बदलत असून, आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता बदल करण्याच्या विचारात असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केला.

सांगली आणि जळगाव महानगरपालिकेचे निकाल उद्या (ता. 3) लागणार असून सांगली महापालिकेमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला बहुमत मिळेल, असा आशावाद मलिक यांनी व्यक्त केला.

राज्यातील एकंदरीत वातावरण पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली आणि जळगाव या दोन्ही महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या प्रचाराला उपस्थित राहू शकले नाहीत. याचाच अर्थ जनतेमध्ये रोष आहे हे त्यांना माहीत आहे, असा टोला लगावत सध्या राज्यात परिस्थिती बदलत असून, आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता बदल करण्याच्या विचारात आहेत आणि तसेच निकाल लागतील, असेही मलिक म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com