अजित पवारांना तेवढंच काम उरलंय - मुख्यमंत्र्यांची टीका 

राज्यात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतायेत, शेतकरी चिंतेत आहे, पण मुख्यमंत्र्यांना त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, पण लातूरात 2019 चा मुख्यमंत्री मीच हे सांगायला मात्र त्यांना वेळ आहे, ते अजूनही स्वप्नातच आहे का? अशी टीका अजित पवारांनी या मेळाव्यात बोलतांना केली होती.
Devendra Phadanavis-Ajit Pawar New
Devendra Phadanavis-Ajit Pawar New

औरंगाबाद : पुढचा मुख्यमंत्री मीच म्हणणारे देवेंद्र फडणवीस अजूनही स्वप्नातच आहेत का? असा खोचक सवाल विचारणारे राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्र्यांनी 'अजित पवारांना आता तेवढंच काम उरलंय' अशा शब्दांत उत्तर दिले. 

औरंगाबादेत जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (ता. 10) शहरात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी बैठकीची माहिती दिली. मंगळवारी संविधान बचाव, देश बचाव या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित मेळाव्यात बोलतांना अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. 

राज्यात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतायेत, शेतकरी चिंतेत आहे, पण मुख्यमंत्र्यांना त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, पण लातूरात 2019 चा मुख्यमंत्री मीच हे सांगायला मात्र त्यांना वेळ आहे, ते अजूनही स्वप्नातच आहे का? अशी टीका अजित पवारांनी या मेळाव्यात बोलतांना केली होती. पत्रकार परिषदेत या संदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्‍न केला असता 'अजित पवारांना आता तेवढंच काम उरलंय' असे म्हणत त्यांनी या टीकेचा समाचार घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com