गिरणी कामगारांसाठी घरांची लवकरच सोडत - मुख्यमंत्री फडणवीस

DEVENDRA
DEVENDRA

मुंबई   :  गिरणी कामगारांसाठी एमएमआरडीए क्षेत्रातील घरांमध्ये 50 टक्के आरक्षण ठेवले जाणार आहे. त्याची सोडत तत्काळ काढली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. 

गिरण्यांच्या जमिनीवरील बांधकाम वगळता मोकळ्या जागेपैकी 33 टक्के जागेवर घरांसाठी जागा उपलब्ध होत असे. मात्र नियम 58 अंतर्गत बदल करण्यात येत असून त्यामुळे संपूर्ण जागा ग्राह्य धरण्यात येणार असल्याने गिरणी कामगारांना अधिक घरे मिळतील, असे फडणवीस यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांनी विधान परिषदेत गिरणी कामगार उपोषणाला बसले असल्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यांनीच एमएमआरडीए क्षेत्रातील घरांची सोडत तत्काळ काढण्याची मागणी केली. ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. 

फडणवीस म्हणाले की,'मुंबई वगळता आपापल्या जिल्ह्यांमध्ये गिरणी कामगारांनी घरे स्वीकारली तर मुंबईपेक्षा अधिक मोठी जागा त्यांना देणे शक्‍य होईल. मुंबईतच घर हवे, असा आग्रह असल्याने इतर जिल्ह्यांसाठी फारसा प्रतिसाद नसल्याचेही त्यांनी सांगितले. याविषयीचा प्रश्‍न कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी उपस्थित केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com