राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच  अर्थसंकल्प मांडताना  सभागृहाची परंपरा पायदळी- छगन भुजबळ

''राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सभागृहात मांडलेल्या हंगामी अर्थसंकल्पातून पुढील चार महिन्यात राज्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणांचा अवकाळी पाऊस पाडला असल्याचे चित्र आहे. मुळात राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाण्याअगोदर समाजमाध्यमांवर तो प्रसारित झाला होता. इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षाच्या अनुपस्थित अर्थसंकल्प मांडला गेल्याने सभागृहाची प्रतिमा मलीन केली गेली असून सभागृहाची परंपरा, कायदे, नियम पायदळी तुडवण्यात आले आहेत," अशी टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच  अर्थसंकल्प मांडताना  सभागृहाची परंपरा पायदळी- छगन भुजबळ

नाशिक : ''राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सभागृहात मांडलेल्या हंगामी अर्थसंकल्पातून पुढील चार महिन्यात राज्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणांचा अवकाळी पाऊस पाडला असल्याचे चित्र आहे. मुळात राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाण्याअगोदर समाजमाध्यमांवर तो प्रसारित झाला होता. इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षाच्या अनुपस्थित अर्थसंकल्प मांडला गेल्याने सभागृहाची प्रतिमा मलीन केली गेली असून सभागृहाची परंपरा, कायदे, नियम पायदळी तुडवण्यात आले आहेत," अशी टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

ते म्हणाले, "राज्यात कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी मिळण्यासाठी शेतकरी वर्ग अर्थसंकल्पाकडे आशेने पाहत होता. मात्र सरकारकडून सरसगट कर्जमाफीबाबत ब्र देखील काढलेला दिसत नसून केवळ शेतकऱ्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर विविध योजना जाहीर करून  शेतकऱ्याला कुरवाळण्याचा प्रयत्न केला जात असून निव्वळ आश्वासने देऊन शेतकऱ्यांची पुन्हा बोळवण करण्याचा प्रयत्न केला आहे.'' अर्थमंत्र्यांनी जलयुक्त शिवार योजनेवर आतापर्यंत ८९४६ कोटींचा खर्च केल्याचा दावा केला आहे. मग राज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना का करावा लागत आहे, असा सवाल उपस्थित करून योजनेचे पैसे मुरले कुठे अशी टीका त्यांनी केली आहे.

''एकीकडे साठ लाख रोजगार निर्मिती करण्याचा सरकारने उद्देश डोळ्यासमोर ठेवला असतांना आर्थिक पाहणी अहवालातून आलेल्या आकडेवारी नुसार २ लाखापर्यंत शासकीय जागा रिक्त आहे. त्या जागा भरण्याबाबत ब्र देखील काढला गेला नसून केलेल्या घोषणेची अंमलबजावणी कशी केली जाईल याबाबत स्पष्टता दिसत नाही. राज्यावर साडेचार लाख कोटीहून अधिक कर्जाचा डोंगर झाला असतांना राज्याच्या महसुलात वाढ करण्याबाबत उपाययोजना दिसत नाहीत," असेही भुजबळ म्हणाले.

 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध जाती प्रवर्गातील समाजाला निधी देण्याचे निव्वळ आश्वासन देऊन कुरवाळण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात केला गेला असला तरी टर्म संपत आलेल्या सरकारकडून याची अंमलबजावणी होणार कधी असा सवाल उपस्थित करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस सरकारचा हा निवडणूक जुमला असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com