जवानांचे कुटुंबीय, जनता टाहो फोडत असताना मोदी राजकीय सभा घेतात हे खेदजनक : छगन भुजबळ

"पुलवामा येथील घटना अतिशय दुर्दैवी व खेदजनक आहे. त्याचा तीव्र निषेध आम्ही करीत आहोत. मात्र, देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व जवानांवर अंत्यसंस्कार देखील झालेले नसताना, गावोगावी जनता टाहो फोडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा अन् भाजप नेते निवडणुकीच्या राजकीय सभा घेतात फिरतात, हे अत्यंत खेदजनक आहे," अशी नाराजी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज व्यक्त केली.
जवानांचे कुटुंबीय, जनता टाहो फोडत असताना मोदी राजकीय सभा घेतात हे खेदजनक : छगन भुजबळ

नाशिक  : "पुलवामा येथील घटना अतिशय दुर्दैवी व खेदजनक आहे. त्याचा तीव्र निषेध आम्ही करीत आहोत. मात्र, देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व जवानांवर अंत्यसंस्कार देखील झालेले नसताना, गावोगावी जनता टाहो फोडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा अन् भाजप नेते निवडणुकीच्या राजकीय सभा घेतात फिरतात, हे अत्यंत खेदजनक आहे," अशी नाराजी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज व्यक्त केली.

झाडी (ता. मालेगाव) येथे प्रकल्पाच्या पाहणीसाठी ते गेले होते. यावेळी ते म्हणाले, "पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांची संख्या चव्वेचाळीस झाली. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य व तीव्रता आणखी वाढले. अत्यंत निषेधार्ह ही घटना आहे. सत्तर वाहनांच्या ताफ्यातून या जवानांना नेले जात होते. एकावेळी एव्हढा ताफा नेणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नव्हते. हल्ल्याबाबत सुचना होती. रस्ता 'सॅनीटाईज' करायला हवा होता. हल्ला होईल ही शक्यता व्यक्त झालेली होती. त्यामुळे यामध्ये गुप्तवार्ता मिळवण्यात अपयश आलं हे  नक्कीच आहे. ही दुर्दैवाची घटना टाळणे शक्य होते का हे भविष्यात कळेल."

ते म्हणाले, "याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी विरोधी पक्षांसह सरकारला पुर्ण पाठबळ व्यक्त केले. अशा प्रसंगी फूट पाडण्याची शत्रुंचा हेतु त्यांनी विफल करत संपुर्ण देश एक आहे हे दाखवून दिले. राहुल गांधी यांची परिपक्वता त्यात दिसते. याउलट आज जे पंतप्रधान आहेत, ते नरेंद्र मोदी २०१४ मध्ये घडलेल्या घटनांवर काय बोलत होते हे आठवुन पहा. जणू काही सर्व काँग्रेसमुळे झाले व तेव्हाचे पंतप्रधान डाॅ मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानला मोकळे सोडले आहे, असे चित्र ते उभे करत होते. वस्तुतः तेव्हा परिस्थिती जास्त नियंत्रणाखाली होती. आज जास्त चिंताजनक स्थिती आहे. काश्मीरमध्ये जास्त नागरीक व जवान मारले गेले आहेत."

छगन भुजबळ पुढे म्हणाले, ''देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांचे मृतदेह त्यांच्या घरी पोहोचले नव्हते, अंत्यसंस्कार देखील झालेले नव्हते. जवानांचे कुटुंबीय शोकसागरात बुडालेले  होते. त्यांचे गावकरी दुखःमुळे टाहो फोडत होते. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनेच्या दुस-याच दिवशी लोकसभा निवडणुकीच्या राजकीय सभा घेतात. अमित शहा राजकीय कार्यक्रम रद्द करत नाहीत तर सभांतून 'राम मंदिर वही बनायेंगे'च्या घोषणा बोलतात. कोणताही भाजपचा नेता राजकीय कार्यक्रम रद्द करत नाही. याचा मला खेद वाटतो. सबंध देशवासी हे पहात आहेत."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com