अतिरेकी हिंदू दहशतवादाला मिळाला राजाश्रय  : प्रा. अंजलीताई आंबेडकर

भाजप सरकारच्या काळात अतिरेकी हिंदू दहशतवादाला राजाश्रय मिळाल्यामुळे हिंसक घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र गरीब हिंदूंचा वापर दहशत निर्माण करण्यासाठी मोठ्या सफाईने होत असल्याचेच पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येतून उघड झाले आहे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी `सरकारनामा'शी बोलताना केले.
अतिरेकी हिंदू दहशतवादाला मिळाला राजाश्रय  : प्रा. अंजलीताई आंबेडकर

बुलडाणा : भाजप सरकारच्या काळात अतिरेकी हिंदू दहशतवादाला राजाश्रय मिळाल्यामुळे हिंसक घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र गरीब हिंदूंचा वापर दहशत निर्माण करण्यासाठी मोठ्या सफाईने होत असल्याचेच पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येतून उघड झाले आहे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी `सरकारनामा'शी बोलताना केले.

जिल्ह्यातील भारिप बहुजन महासंघाचे महिला संघटन मजबुत करण्याच्या उद्देशाने त्या दौर्‍यावर होत्या. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

यावेळी पक्षाच्या राज्य कार्यकारिणी सदस्या अरुंधती सिरसाट, प्रा. मंगल खिवसरा, बुलडाणा जिल्हाध्यक्ष विष्णू उबाळे आदी उपस्थित होते.

श्रीमती आंबेडकर पुढे म्हणाल्या, की जाती अंताच्या लढाईसाठी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण प्रयत्नशील आहोत. निवडणुका येतील आणि जातील, मात्र हा लढा कायम सुरू राहील. याकरिता महिला सक्षम झाली पाहिजे. बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखालील भागात पक्षाचे महिला संघटन मजबुत आहे. त्याचप्रमाणे घाटावरदेखील नवीन नियुक्त्या करून संघटन मजबुत केले जाईल. महिला व एकंदरीतच हिंसाचार आणि अन्यायाच्या घटना सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे या विराधोत मोठी शक्ती उभी करून लढा देण्याची आवश्यकता आहे. 

अलीकडच्या काळात जातीभेद नष्ट करण्याऐवजी त्याला खतपाणी घालून माणसा-माणसांमध्ये द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जाणीवपूर्वक केले जाणारे हे प्रकार थांबविणे हे आमच्यासमोरील लक्ष्य राहणार आहे. भारिप बहुजन महासंघाच्या अनेक महिला पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी स्वतंत्ररीत्या कारभार सांभाळत आहेत. यापुढील काळात पक्षाची महिला फळी मजबुत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

भारिप बहुजन महासंघाच्या पक्ष म्हणून श्रीमती आंबेडकर यांनी संघटनात्मक बांधणीसाठी पुढाकार घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com