खोटे आश्‍वासने देणाऱ्यांपासून सावध रहा : खासदार शत्रुघ्न सिन्हा

गेल्या निवडणुकीत काही लोकांनी खोटी आश्‍वासने दिली होती. या आश्‍वासनांवर विसंबून तुम्ही मतदान केले. आता खरे रूप तुम्हाला दिसले. परंतु आता या खोटे आश्‍वासने देणाऱ्यांवर विश्‍वास ठेऊ नका, खोटे बोलणाऱ्यांना येत्या निवडणुकीत मतदारांनी ताकद दाखविण्याची वेळ आली आहे, असे आवाहन भाजपचे खासदार व प्रसिद्ध अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी आज नागपुरात केले.
खोटे आश्‍वासने देणाऱ्यांपासून सावध रहा : खासदार शत्रुघ्न सिन्हा

नागपूर : गेल्या निवडणुकीत काही लोकांनी खोटी आश्‍वासने दिली होती. या आश्‍वासनांवर विसंबून तुम्ही मतदान केले. आता खरे रूप तुम्हाला दिसले. परंतु आता या खोटे आश्‍वासने देणाऱ्यांवर विश्‍वास ठेऊ नका, खोटे बोलणाऱ्यांना येत्या निवडणुकीत मतदारांनी ताकद दाखविण्याची वेळ आली आहे, असे आवाहन भाजपचे खासदार व प्रसिद्ध अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी आज नागपुरात केले.
 
उत्तर भारतीय परिषदेतर्फे नागपुरात आयोजित कार्यक्रमात शत्रुघ्न सिन्हा आज नागपुरात आले होते. यावेळी कॉंग्रेसचे नेते व माजी खासदार संजय निरुपमही उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता खासदार सिन्हा यांनी केंद्र सरकारवर आपल्या शैलीने टीका केली. 

यावेळी बोलताना खासदार सिन्हा म्हणाले, चार वर्षांपूर्वी सत्तेत येण्यापूर्वी खूप आश्‍वासने तुम्हाला मिळाली होती. आता काय झाले? महागाई आकाशाला भिडली आहे, डॉलरच्या तुलनेत रुपया दररोज गडगडत आहे, करोडो रुपयांचा राफेल घोटाळा झाला आहे. चांगले काहीही झाले नाही. केवळ खोटे बोलून लोकांना फसविण्याचे काम झाले. आता येत्या काही महिन्यात निवडणुका होणार आहे. चार वर्षांपासून खोटे आश्‍वासने देणाऱ्यांना उत्तर देण्याची वेळ आता आली आहे. या निवडणुकीत आपले आश्‍वासने पूर्ण करणाऱ्या, खोटे आश्‍वासने न देणाऱ्या लोकांना तुम्ही निवडून द्या, असे आवाहन खासदार सिन्हा यांनी यावेळी केले. 

भाजपला 70 कोटींची दलाली- निरुपम 
विजय माल्ल्या याला भारतातून पळून जाण्यासाठी भाजपने 70 कोटी रुपयांची दलाली घेतल्याचा आरोप मुंबई प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष व माजी खासदार संजय निरुपम यांनी यावेळी केला. मोदी सरकारवर थेट हल्ला चढविताना निरुपम यांनी मोदी सरकारने विजय माल्याला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला. मोदींच्या गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले होत असल्याचा आरोप करून निरुपम म्हणाले, पंतप्रधान मोदी वाराणशी येथून खासदार म्हणून निवडून आलेले असतानाही गुजरातमध्ये मात्र उत्तर भारतीयांवर हल्ले होत असल्याचा आरोप निरुपम यांनी केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com