शेट्टींना हाताशी धरून भाजपकडून शेतकऱ्यांचे नुकसान : रघुनाथ पाटील

सूर्याजी पिसाळा प्रमाणे फितूर राजू शेट्टींसारख्या लोकांना हाताशी धरून शासनाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. भार्गव समिती सूत्रानुसार उपपदार्थतील 50 टक्के नफा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी मिळून लढा उभा केला पाहिजे. तुमच्या सर्व कर्जाची जबाबदारी मी घेण्यास तयार आहे - रघुनाथदादा पाटील
शेट्टींना हाताशी धरून भाजपकडून शेतकऱ्यांचे नुकसान : रघुनाथ पाटील

सातारा : ''सूर्याजी पिसाळाप्रमाणे फितूर राजू शेट्टी सारख्या लोकांना हाताशी धरून भाजप सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. निरव मोदी, विजय मल्या कर्ज बुडवून गेला तरी बॅंका बुडाल्या नाहीत मग लाखांत कर्जे असूनही शेतकरी काळजीतून आत्महत्या करत आहेत. नाना पाटील यांचा प्रताप आता विसरून चालणार नाही. रडत बसू नका लढण्यासाठी सज्ज व्हा, हमीभाव नसल्याने कर्ज बुडवा," असा सल्ला शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी दिला. 

क्षेत्रमाहुली (ता. सातारा) येथील संस्कृती मंगल कार्यालयात आयोजित शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत रघुनाथदादा पाटील बोलत होते. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, युवा आघाडीचे अध्यक्ष शंकरराव गायकवाड, पुण्याचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा वंदनाताई माळी, पश्‍चिममहाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पठारे, जिल्हाध्यक्ष विकास जाधव, टी. के. आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती. 

रघुनाथदादा म्हणाले, साडेनऊ टक्के ऐवजी 10 टक्के रिकव्हरीचा पाया धरल्याने शेतकऱ्यांचा 1080 रुपये तोटा होत आहे. रिकव्हरीचा पाया बदलून शेतकऱ्यांचा खिसा कापला जात आहे. गुजरातमध्ये ऊसाला टनाला 4741 रुपये भाव आहे. तुमच्या ऊसाला 1500 रुपये कमी मिळत आहेत. या भामट्या कारखानदार आणि शेतकरी संघटनेतून फुटून गेलेल्यांचा हा प्रकार आहे. त्यामुळे पुन्हा साडे आठ टक्के रिकव्हरी पाया धरून एफआरपी एकरकमी मिळावी," ऊसाला यावर्षी 3500 रुपये पहिला हप्ता मिळावा अशी मागणी त्यांनी केली."

ते म्हणाले, "सूर्याजी पिसाळा प्रमाणे फितूर राजू शेट्टींसारख्या लोकांना हाताशी धरून शासनाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. भार्गव समिती सूत्रानुसार उपपदार्थतील 50 टक्के नफा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी मिळून लढा उभा केला पाहिजे. तुमच्या सर्व कर्जाची जबाबदारी मी घेण्यास तयार आहे, कारण कायदा आपल्या बाजूने आहे. मुळात उत्पादन खर्चावर आधारित भावच मिळात नाही. निरव मोदी, विजय मल्ल्या कर्ज बुडवून गेला तरी बॅंका बुडल्या नाहीत. मग शेतकऱ्यांची लाखात कर्जे असूनही काळजीतून शेतकरी आत्महत्या करत आहेत."

सातारच्या नाना पाटलांचा यांचा प्रताप तुम्ही विसरला काय, असा प्रश्न करून रघुनाथ पाटील म्हणाले, "रडत बसू नका आपल्याला आता लढायचे आहे. हमीभाव नसल्याने आता कर्ज बुडवायचे आहे. मागील वेळी शेट्टी, सदाभाऊंनी एफआरपी अधिक 200 रूपयांवर आंदोलन मागे घेतले." 

केवळ रघुनाथ पाटील यांनी शेवटपर्यंत 3500 एफआरपीवर ठाम राहिले, असे सांगून शिवाजीराव नंदखिले म्हणाले, "एफआरपीचे तुकडे करणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो. सत्ताधारी आणि विरोधक शेतकऱ्यांची वीज कपात होत असताना गप्प आहेत. त्यांचाही आम्ही निषेध करतो.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com