खेड (रत्नागिरी): लोकसभेची उमेदवारी माझे मित्र सुनील तटकरे यांना मिळाली आहे. तटकरेसाहेब तुम्ही एकटे नाहीत. माझी तुम्हाला सदैव साथ असेल. प्रचाराची राळ उठेल त्यावेळी तटकरे-जाधव जोडी विरोधकांना सैरभैर करून सोडेल. त्यावेळी सारा हिशोब आम्ही दोघे मिळून चुकता करू,' अशी ग्वाही भास्कर जाधव यांनी जाहिररित्या दिली.
"तटकरे, रायगड तुम्ही सांभाळा, मी रत्नागिरी संभाळतो,' अशी पुस्तीही त्यांनी जोडली. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेत ते बोलत होते. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा थेट परिणाम कोकणच्या पर्यटनावर होऊ लागला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
ते म्हणाले, "गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत कोकणात अनेक खून झाले. गृहखाते मुख्यंमत्र्यांकडे आहे. त्यांचा वचक राहिलेला नाही. चिपळूण येथे रामदास सावंत, खेड येथे अंकिता जंगम, अंकिता चव्हाण, गुहागरमध्ये सकपाळ बंधू यांचा खून झाला. यामुळे पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवायला सुरवात केली आहे. अद्यापही या साऱ्या घटनांमध्ये आरोपी हाती लागलेले नाहीत. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोऱ्या झाल्या. परंतु चोरटे पकडले गेले नाहीत. अंकिता जंगम खुनानंतर समस्त जंगम समाज खेड येथे उपोषणासाठी बसला. पोलिस अधीक्षकांनी खेडमध्ये येऊनही उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही. त्यामुळे संपूर्ण यंत्रणेवरचा विश्वास उडाला आहे.''
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.