"सीमावासीयांची ठोस बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडा'! 

सीमावासीयांची बाजू न्यायालयात मजबूत मांडण्यासाठी सरकार कटिबध्द आहे. कायदेशीर बाबींची पुर्तता करीत असताना कोणत्याही स्वरपाची कमी राहणार नाही याकडे मी स्वतः जातीने लक्ष देणार आहे.मदन येरावार - राज्यमंत्री, सामान्य प्रशासन विभाग
"सीमावासीयांची ठोस बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडा'! 
"सीमावासीयांची ठोस बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडा'! 

मुंबई : बेळगावमध्ये भूसंपदन करीत असताना कर्नाटक सरकार जाणीवपुर्वक शेतकऱ्यांच्या जमिनी बेकायदेशीरपणे हाडप करीत आहे. त्यामुळे 10 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणी दरम्यान राज्यसरकारने ठोस बाजू मांडावी, अशी मागणी बेळगाव शेतकरी संघटनेने केली आहे. त्यासाठी चारशे पानांची कन्नड भाषेतील भाषांतरीत केलेली कागदपत्रेही सरकारकडे सुपुर्द केली आहेत. 

भूसंपादनाच्या नावाखाली सुरू असलेल्या कर्नाटक सरकारच्या दरडपाशीहीच्या विरोधात बेळगाव शेतकरी संघटनेने कर्नाटक उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करीत असताना उच्च व सर्वोच्च न्यायालयाने बेळगावातील शेतकऱ्यांच्या बाजून निकाल देत कर्नाटक सरकारच्या जुलमी कारभाराचे वाभाडे काढले होते. 

महाराष्ट्र सरकार विरूध्द कर्नाटक सरकार या सुरू असलेल्या सीमावादा संदर्भातील सुनावणी 10 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत असताना कर्नाटक सरकारकडून भूसंपादनाच्या नावाखाली सुरू असलेली दडपशीही न्यायालया समोर मांडण्यात यावी अशी मागणी बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी केली. दरम्यान चारशे पानांची कन्नड भाषेतील भाषांतरीत केलेली कागदपत्रेही सरकारकडे सुपुर्द करण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com