अयोध्यावारीमुळे अधिवेशन आठच दिवस 

अयोध्यावारीमुळे अधिवेशन आठच दिवस 

मुंबई: येत्या 25 नोव्हेंबरला अयोध्या येथे शिवसेनेचा मेळावा असल्याने यंदाचे हिवाळी अधिवेशन फक्‍त आठच दिवस चालणार असून, विधिमंडळाच्या इतिहासात अशी घटना यापूर्वी कधीही घडली नसल्याचे सांगण्यात येते. 

विधिमंडळाच्या तीन अधिवेशनांपैकी एक हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्याची परंपरा आहे. हे अधिवेशन कमीत कमी पंधरा दिवस किंवा त्याहूनही अधिक काळ चालत असे. यंदा राज्य सरकारने पावसाळी अधिवेशन नागपूर येथे घेतल्याने हिवाळी अधिवेशन मुंबईत होत आहे. आज मुंबईत सुरू झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी 30 नोव्हेंबरपर्यंत निश्‍चित करण्यात आला आहे. 

परंतु, या आठवड्यात शनिवार, रविवार वगळून दोन सुट्या आहेत. म्हणजेच अधिवेशन फक्‍त आठ दिवसच सुरू राहणार आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोधी पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर या आठवड्यातील शनिवारी आणि रविवारी कामकाज घेण्याचा सरकारचा विचार होता. या संदर्भात शिवसेनेला सरकारने विनंती केल्याचे समजते. 

मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 25 नोव्हेंबरला अयोध्या येथे पूर्वनियोजित दौरा आहे. राजकीय दृष्टिकोनातून शिवसेनेला हा मेळावा यशस्वी करायाचा असल्याने शिवसेनेचे नेते आणि मंत्री शुक्रवारपासूनच उत्तर प्रदेशकडे रवाना होणार आहेत, त्यामुळे शनिवार आणि रविवारचा दिवस सुटीचाच राहणार असल्याने हे अधिवेशन फक्‍त आठच दिवस सुरू राहणार आहे. 
---- 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com