औरंगाबाद : स्वातंत्र्यदिनी झाल्या 726 गावात ग्रामसभा

aurangabad-jilla-parishad
aurangabad-jilla-parishad

औरंगाबाद, : जिल्हयाच्या 862 पैकी 726 ग्रामपंचायतीमध्ये मंगळवारी (ता.15 )  ग्रामसभा घेण्यात आल्या. तर व्हिलेज सोशल ट्रान्सफार्मेशन अंतर्गत निवडलेल्या 22 गावांच्या ग्रामसभांमध्ये गावांच्या विकासाचा डीपीआर (डिटेल प्रोजक्ट रिपोर्ट ) मंजुर करण्यात आला.

व्हिलेज सोशल ट्रान्सफार्मेशन अंतर्गत पैठण तालू्क्यात 5 तर गंगापूर तालूक्यातील 3 ग्रामपंचायतीमधील 22 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या सर्व योजना 100 टक्के राबवण्यात येणार आहेत. ज्या ग्रामसेवकाकडे 2 ग्रामपंचायतीचा कार्यभार असल्याने व काही ठिकाणी गणपुर्तीअभावी ग्रामसभा होऊ शकल्या नाहीत. तथापि जिथे आज ग्रामसभा होऊ शकल्या नाहीत तिथे उद्या होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे पंचायच विभागाचे उपमुख्य अधिकारी वासुदेव सोळूंके यांनी सांगीतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com