अकोला : जिल्ह्यात सर्वाधिक शेतळ्यांची निर्मिती झाल्याने अकोल्याची ओळख शेततळ्यांचा जिल्हा, अशी झाल्याचा दावा राजकारण्यांनी केला होता. मात्र, आज त्याच जिल्ह्याची ओळख सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा, अशी झाली आहे. चालू वर्षात 110 तर गेल्या 16 वर्षांत एक हजार 961 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या शेतीत राबवणाऱ्या शेतकऱ्यांची काही वर्षापासून दैनावस्था झाली आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतीत काबाडकष्ट करूनही कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी पेलू न शकणारा बळीराजा नैराश्यग्रस्त होऊन आत्महत्येकडे वळत आहे. सरकारने जाहीर केलेले पॅकेज आणि योजना शेतकरी आत्महत्या थांबवण्यात निकामी ठरत आहे.
अकोला जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मोठा गाजावाजा करीत "मिशन दिलासा' हा अभिनव उपक्रम सुरू केला. सुरवातीच्या काळात लोकसहभागातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसाठी तसेच नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांसाठी रोजगाराची साधने उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, त्यांच्या बदलीनंतर "नवा गडी नवा राज'प्रमाणे प्रशासनाचे या उपक्रमाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे जिल्ह्यातील आत्महत्यांच्या एकत्रित आकडेवारीवरून दिसून येते.
दृष्टीक्षेपात शेतकरी आत्महत्या
वर्ष - शेतकरी आत्महत्या
वर्ष - शेतकरी आत्महत्या
2001 -06
2002 - 07
2003 - 19
2004 - 46
2005 - 41
2006 - 174
2007-125
2008-165
2009-136
2010-200
2011-177
2012-178
2013-136
2014-195
2015-165
2016-109
2017-91
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.