ईव्हीएमपेक्षा बॅलेट पेपरवर अधिक विश्वास : अखिलेश

ईव्हीएमपेक्षा बॅलेट पेपरवर  अधिक विश्वास : अखिलेश

लखनौ : योगी आदित्यनाथ यांचे उत्तरप्रदेशातील सरकार जनतेची फसवणूक करून सत्तेवर आल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज केला. भाजपच्या खोटारडेपणाविरुद्ध कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी करण्याची तयारी आहे. ईव्हीएमच्या तुलनेत बॅलेट पेपरवर शंभर टक्के विश्‍वास आहे असेही ते म्हणाले. 

तत्पूर्वी शुक्रवारी बसपच्या अध्यक्षा मायावती यांनी भाजपविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत भाजपविरोधी गटाशी हातमिळवणी करण्याचे सूतोवाच केले होते. आता अखिलेश यादव यांनी भाजपविरोधात आघाडी करण्याचे आवाहन केले आहे. येथे पत्रकारांशी बोलताना यादव म्हणाले,"" भाजपने जात आणि धर्माच्या नावावर मतदारांची विभागणी केली आणि खोटे आश्‍वासने देऊन सत्ता मिळवली. हे सरकार जनतेचा विश्‍वासघात करून आले आहे. भाजपच्या या खोटारडापणाविरुद्ध मार्ग काढण्याची गरज आहे. यासाठी विरोधी पक्षात आघाडी असणे गरजेचे आहे. या आघाडीत समाजवादी पक्षाची भूमिका महत्त्वाची असेल.''  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com