राष्ट्रवादीच्या फिक्सर नेत्यांना अजितदादांची वाॅर्निंग; परत पक्षात येण्यासाठी माफीनामा लिहून घेणार

महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्येचैतन्य निर्माण करण्यासाठी आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली.पक्षाच्या विविध 24 सेलच्या माध्यमातून कार्यकरत असलेल्या पदाधिकाऱ्यांची फळी भक्कम असायला हवी, त्यांनी कामात सातत्य ठेवावे, हजारी यंत्रणा नेहमी सक्रीय असावी, अशा अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केल्या.
राष्ट्रवादीच्या फिक्सर नेत्यांना अजितदादांची वाॅर्निंग;  परत पक्षात येण्यासाठी माफीनामा लिहून घेणार

पुणे, ता. 5 : "पुणेकरांचे प्रश्‍न आणि पक्ष हिताच्या धोरणांमध्ये "फिक्‍सिंग' करून, तसे केलात तर, "तुमचा मोहम्मद अझरुद्दीन' होईल. मग, तुमच्यावर चित्रपट निघेल,'' अशा शब्दांत पक्षाविरोधी कारवाई करणाऱ्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी तंबी दिली. "पक्षाचे लेटरहेड केवळ मिरविण्यापुरते ठेवू नका. ज्यांना पक्ष संघटनेचे काम करायला वेळ नाहीत, त्यांची आता गय केली जाणार नसल्याचे सांगत, निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना थेट बाहेर रस्ता दाखविण्याचा इशाराही पवार यांनी दिला. 

पवार म्हणाले, ""निवडणुकांमधील पराभवामुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी चिंतन केले पाहिजे. त्यातून धडा घेऊन कामाचा झपाटा वाढविण्याची गरज आहे. अशा कार्यकर्त्यांना नेहमी बळ देऊ. मात्र, उगाचच मिरविण्यासाठी लेटरहेडपुरते कार्यकर्त्यांना आता थारा देणार नाही. ज्या कार्यकर्त्यांना स्वगृही यायचे आहे, त्यांना आता हारतुरे नसतील. पक्षात यायचे असेल तर इतर पक्षात जाऊन चूक झाल्याचा अर्ज द्यावा लागेल. सोशल मिडियाचा चांगला वापर केला पाहिजे. या माध्यमातून विरोधी पक्षाच्या नेत्यांचीही बदनामी करू नये. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्यास पोलिसांकडे तक्रार करेल.'' 

माझे तिकिट कापले तर....?

पक्षाच्या मेळाव्यातील आपल्या भाषणात अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे जोरदार टोलेबाजी केली. ""पक्ष बांधणीसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मार्गदर्शनाखाली राज्यभर दौरे सुरू आहेत. त्यामुळे पुण्यात आता पुण्यात फारसा वेळ देता येत नाही. प्रदेशाध्यक्ष सांगेल, तिकडे जावे लागत आहे. त्यांचे ऐकावेच लागते. पुढील विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी तटकरे यांच्याकडेच असेल तर ? निवडणुकीत तिकिट देण्याचे काम त्यांच्याकडे असते. त्यामुळे त्यांचे मला ऐकावेच लागते,नाही तर माझे तिकिट कापले जाईल, अशी फिरकी पवार यांनी घेतली. त्यावर टाळ्या वाजवून उपस्थितांनी दाद दिली. 

अजित पवार होता म्हणून उभारला.... !

लोकांपर्यत पोचण्यासाठी पक्षात चांगले प्रवक्ते निर्माण झाले पाहिजेत. मात्र, प्रवक्ता हा संयमी असावा लागतो. तो सटकणारा नसावा. काही जणांची सटकत असते. "माझी सटकते, त्यामुळे मी प्रवक्ता होऊ शकत नाही. बोलनाता तारत्म्याने बोलावे लागते. तारत्म्य सोडून बोललात, मोठी किमत मोजावी लागते. बोलताना चुकलात तर घरी बसावे लागते, असे म्हणताच, पुन्हा टाळ्यांची दाद मिळाली. "बोलण्यामुळे काय होते, याची चांगलरी कल्पना मला आहे. त्यातून मी (अजित पवार) होतो, म्हणून उभा राहिलो, अन्यथा शक्‍य नसते,' अशी टिप्पणीही त्यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com