राज ठाकरे हे बोलघेवडे : अजित पवार यांचा टोला

राज ठाकरे हे बोलघेवडे : अजित पवार यांचा टोला

पुणे : बोलघेवड्या लोकांना फार काही करायचे नसते. त्यांना काही दाखवयाचं नसतं. त्यांची एखादी सभा झाली की निघून जायचं असतं, अशी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज यांनी त्यांच्यावर केलेल्या टिकेला उत्तर दिले.

आमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी काही थेट प्रश्न विचारले होते. १९६० ते २०१८ या कालावधीत झालेला सिंचनाचा निधी कुठे मुरला? तो जर मुरला नसता तर महाराष्ट्राची पाण्याची पातळी खाली गेली नसती, अशी टीका राज यांनी केली.

राज हे भाषण करून निघून गेले. त्यानंतर अजित पवार हे भाषणाला उभे राहिले. त्यांच्या जिव्हारी राज यांची टीका लागलेली होतीच. त्यांनी थेट राज यांचे नाव घेतले नाही. मात्र बोलघेवड्या लोकांना फार काही करायचं नसतं, असं टोला अजित पवार यांनी लगवाला. 

महाराष्ट्राच्या पाणीप्रश्नाविषयी बोलताना अजित पवार यांनी पीक पॅटर्न बदलण्याची गरज असल्याचे नमूद केले. उसासारखी पिके घेतली तर तर हा दुष्काळ कधीच दूर होऊ शकत नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. वाॅटर कपच्या निमित्ताने लोक पाणीप्रश्नावर एकत्र येतात, ही फारच महत्त्वाची बाब आहे. आमीर यांच्या या कामामुळे महाराष्ट्र पाणीदार होण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com