अटलजींच्या निधनाने राष्ट्रसूर्याचा अस्त : अजित पवार

Vajpayee-777
Vajpayee-777

मुंबई  : "माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानं राष्ट्रसूर्याचा अस्त झाला आहे. उच्च नैतिकमूल्यं व वैचारिक अधिष्ठान असलेलं राष्ट्रीय नेतृत्वं आपण गमावलं आहे," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला . 

आपल्या शोक संदेशात अजित पवार म्हणतात ," स्वपक्षासह विरोधकांचा विश्वास संपादन केलेले ते एकमेव नेते होते. प्रखर देशभक्त, संसदीय लोकशाहीवर प्रगाढ श्रद्धा, महान साहित्यिक, कविमनाचं संवेदनशील व्यक्तिमत्वं ही त्यांची ओळख होती. त्याचं वक्तृत्वं अद्वितीय होतं. त्यांच्यासारखा वक्ता, त्यांच्यासारखा नेता, त्यांच्यासारखा माणूस पुन्हा होणे नाही.सत्तारुढ आणि विरोधकांनी मिळून देशाला, लोकशाहीला पुढे घेऊन जाण्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला होता. त्यांच्या निधनानं देशाची, आंतराराष्ट्रीय राजकारणाची, लोकशाही परंपरेची मोठी हानी झाली आहे. मी त्यांच्या कार्याला, स्मृतींना, विचारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com