भाजप सरकार शेतकरीविरोधी: अजित पवार 

कुलभूषण जाधव यांचा कोणताही दोष नसताना त्यांना पाकिस्तानच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या सुटकेसाठी पंतप्रधानांनी सर्वस्व पणाला लावून प्रयत्न करायला हवेत. अन्यथा पाकिस्तानचे नाक अशा पद्धतीने दाबा की त्यांचे तोंड उघडेल. यासाठी आम्ही सर्व पंतप्रधानांच्या पाठीशी आहोत.-अजित पवार
भाजप सरकार शेतकरीविरोधी: अजित पवार 
भाजप सरकार शेतकरीविरोधी: अजित पवार 

सातारा : बड्या धेंड्यांची कर्जे सरकार भरत असून त्यांच्या बॅंकांना एनपीएतून बाहेर काढत आहे. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करत नाही, शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे भाजप सरकारचे धोरण आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

ते साताऱ्यातील कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, देशात साखर मोठ्याप्रमाणात उपलब्ध असताना भाजप सरकारने परदेशातून पाच हजार मेट्रिक टन साखर आयात केली आहे. यातून साखरधंदा अडचणीत येणार आहे. संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा सातारा जिल्ह्यातून घेण्याच्या दृष्टीने विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com