पुरंदरे यांना पद्‌मविभूषण, आता महाराष्ट्र पेटवू - जितेंद्र आव्हाड

.
पुरंदरे यांना पद्‌मविभूषण, आता महाराष्ट्र पेटवू - जितेंद्र आव्हाड

मुंबई : केंद्र सरकारच्यावतीने ज्येष्ठ इतिहास अभ्यासक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्‌मविभूषण पुरस्कार जाहीर झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयाला विरोध करून महाराष्ट्र पेटवण्याचा इशारा दिला आहे. 

पुरंदरे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यावर आव्हाड यांनी काल रात्रीच ट्विट करून महाराष्ट्र पेटवण्याचा इशारा दिला आहे. शिवरायांची बदनामी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन शिवप्रेमींच्या जखमेवर या सरकारने मीठ चोळले आहे असा दावाही त्यांनी आपल्या ट्विट मध्ये केला आहे. 

आता राज्यभर शिवसन्मान परिषद घेऊ असे सांगत त्यांनी हे सरकार मनुवाद्याचे मुकुटमणी असल्याचा आरोप केला आहे. 2015 मध्ये राज्य सरकारच्यावतीने पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला त्यावेळीदेखील आव्हाड यांनी या पुरस्काराला तीव्र विरोध केला होता. आव्हाड यांच्याबरोबरीने त्यावेळी संभाजी ब्रिगेडनेही पुरंदरे यांच्या पुरस्काराला विरोध केला होता. आता पुन्हा एकदा आव्हाड यांनी पुरंदरे यांच्या विरोधात वातावरण निर्मिती सुरू केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com